पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
तुडवण : ललित लक्षवेधी पुस्तक.  फेब्रुवारी २०२०
इमेज
दैनिक ॲग्रोवन (सकाळ)  पेपर मध्ये पत्रकार सूर्यकांत नेटके यांनी  करून दिलेला तुडवण कादंबरीचा परीचय. 

'गावा गावाशी जागवा '

इमेज
गाव : नवे रंग, नव्या जखमा                                डाॅ. कैलास दौंड   गावच्या सुपिक मातीला आता नापिकीचे बहर येतांना दिसू लागले आहेत. पहिल्या पावसानंतर येणारा मृदगंध रोमारोमात चैतन्य भरवण्या ऐवजी रोगराईला साद घालत आहे. मात्र तरीही गावातील अस्सल सर्जनाची ओढ काही संपलेली नाही. बदलत्या काळात जग बदलत असतांना गाव बदलणे अगदीच सहाजिकच होते. बदल हा तर सृष्टीचा नियमच त्याला अव्हेरून कसे चालेल. मात्र या बदलाला व्यक्तिगत स्वार्थ,  नियोजनशून्यता आणि  दूरदृष्टीचा अभाव याची कुसंगत लाभल्याने गावाच्या नव्या रंगात नव्या जखमांचे दर्शन सहजच घडू लागले आहे .  नवनिर्मितीचा लोभस  रंग कायमच माणसाला खुणावत आलेला आहे. उगीचच भाबडेपणाने ' जुने ते सोने' उगाळणे योग्य नसले तरी या गाव बदलांचा मागोवा घेणे हे नव्या पिढीला भान येण्यासाठी आवश्यकच असते.                गाव बदलत असतांना आधी बदलल्या त्या गावच्या  वाटा. गावात येणारे पाणंद रस्ते एक बैलगाडी धावू शकेल एव...

□ गाव चिरंतन आहे. ___________________डॉ. कैलास दौंड (अप्र)

इमेज
                □ गाव चिरंतन आहे. ___________________डॉ. कैलास दौंड ________________________________     काळाच्या लाटा येती , गावाच्या भाळावरती ।     गावपणाला येते जाते, ओली- सुकीशी माणूस भरती॥         लोकवस्तीच्या रूपाने अस्तित्वात असणारा गाव तगधरू आहे. आता मोडेल, संपेल,उदासपणे ओस पडेल, केवळ खुणा उरतील असे वाटत असतांनाच कुठेतरी त्याला पालवी फुटत असते. कात टाकून गाव नवे रूप घेत असते. एकुणच काय तर गाव कमालीचे तग धरू आहे. म्हणूनच गावाला शेकडो वर्षाचा इतिहास असतो. त्याची पूर्वीची नावे वेगळी असतात, काळानुरूप गाव नवी नावे सुद्धा धारण करते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे गावाला कधीकधी त्याची जागा बदलावी लागते. अशा कठीण काळातही गाव आपले आधीचे नाव आणि आधीचे जगणे विसरत नाही. काळाचे आणि बदलाचे अनेक आघात झाले तरीही गाव जिवंत राहण्याचा प्रयत्न करत राहते. गावाच्या लेखी ते जणू अपरिहार्य असते. गाव जमीन, डोंगर, घरे, रस्ते, शाळा इत्यादींनी बणलेले असले तरी ते जैविक दृष्ट्या आणि सेंद्रीय दृष्ट्याही एकसंघ असते. ...

गाव : उब आणि धग

 ( गाव : उब आणि धग )   ○ देवाच्या दिवट्या आणि गोंधळलेली गावं.                  डॉ. कैलास दौंड     पूर्वी म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी सायंकाळी जेवणखाणं झालं की घरासमोर गप्पा मारत बसणं हे नित्याचच असायचं. त्याला अपवाद असायचा तो पावसाळ्यातील सर्द रात्रींचा. एरवी हिवाळा असो की उन्हाळा रात्री दहा अकरा वाजेपर्यंत गप्पाष्टक रंगायचच. शेतातील कामाच्या संबंधानं गप्पांना सुरूवात होई. मग त्या त्याला फाटे फुटतील तशाच पुढे जात. त्यात अनेक प्रसंग असत, अनेक गावे असत, कितीतरी किस्से असत, काही गोष्टी असत, काही घटना सत्य असत तर काही गप्पा सत्य घटनेवर आधारलेल्या असत. काही तर तद्दन खोट्या वाटतील इतक्या काल्पनिक असत. एकुणच एक अद्भुत दुनिया अशा गप्पात अनुभवायला मिळे. त्यामुळे सहाजिकच लहान मुलांना या गप्पांना ऐकत रहावेसे वाटे. जणू रहस्यकथांचे एखादे पुस्तकच आपल्यापुढे उलगडते आहे असे वाटे. इथे कोणीतरी राक्षसासारखे काम करणारा असे. कुणीतरी भुतासोबत बोललेला असे, कुणी चोरांना घाबरवलेले असे तर कुणी आणखी काहीतरी दिव्य केलेले असे. या गप्पांना कसले...

तुडवण कादंबरी

इमेज
दैनिक  उद्याचा मराठवाडा  संपादक राम शेवडीकर  दिनांक २/२/२०२०