पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे गाणे आनंदाचे ॥ पुस्तक परीक्षण प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

इमेज
 पुस्तक परीक्षण  प्रकाश रामचंद्र क्षीरसागर  --------------------------------------  माझे गाणे आनंदाचे   माझे गाणे आनंदाचे हा कैलास दौंड यांचा बालकवितासंग्रह. शिक्षक असल्यामुळे कैलास दौंड यांना मुलांच्या आवडीनिवडी आणि छंदांची नाडी सापडलेली आहे. कैलास दौंड यांच्या या संग्रहात एकूण ३७ कविता आहेत. या कविता विविध छंदातील आहेत. विशेष म्हणजे मुलांना गुणगुणता याव्यात अशा त्या अल्पाक्षरी आहेत.  ग्रामीण परिसरात त्यांचे बरेच आयुष्य गेले असल्याने ग्रामीण परिसर झाडे वेली आणि फुले पानांबरोबर पशुपक्षी येणे स्वाभाविक आहे. या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या संग्रहातील प्रत्येक कवितेला पूरक आणि आकर्षक असे चित्र आहे. लहान मुलांच्या मनातील भाव ओळखून त्या पद्धतीचे लेखन करणे तसे कठीण त्यातूनही आजकालच्या नव्या पिढीतील मुलांचे भावविश्व वेगळेच आहे. या संग्रहातील बालनायक किंवा नायिका या मधल्या पिढीतील आहेत. थोडे शहरीकरण होत असतानाच्या या कविता असाव्यात असा अंदाज त्या वाचताना येतो.  म्हणजे नव्या सहस्रकापूर्वीच्या काही दशकातील वातावरणात वाढलेल्या निरागस मुलामुलींच्य भावविश्...

● उद्ध्वस्त खेडी आणि पडीक शेतीचं आक्रंदन : 'आगंतुकाची स्वगते' । • प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (गोवा)

इमेज
 पुस्तक परीक्षण      ● उद्ध्वस्त खेडी आणि पडीक शेतीचं आक्रंदन : 'आगंतुकाची स्वगते'                                  • प्रकाश रामचंद्र क्षीरसागर  (गोवा)               कैलास दौंड  यांचा 'आगंतुकाची स्वगते' हा कवितासंग्रह ग्रामीण भागाचे प्रतिबिंब आहे. शेतकरी आणि त्यांच्या व्यथा वर्णन करणाऱ्या कविता त्यांनी 'उसाच्या कविता' , 'वसाण' , 'भोग सरू दे उन्हाचा' व 'अंधाराचा गाव माझा' या संग्रहातून मांडल्या आहेतच. 'आगंतुकाची स्वगते' या संग्रहात  शेती, शेतकरी आणि सामान्य माणूस केंद्रित कविता आहेत.            'सल आणि ओल'  या विभागातील पहिलीच कविता 'वाचवणं महत्त्वाचं' शेतकऱ्यांच्या दुःखानं हृदय पिळवटून टाकते. शेतकऱ्याला सरकार, तथाकथित बुद्धिवादी आणि आंदोलकही त्याला सुचवत असतात, या सुचनांतून शेतीवरचा पर्यायानं सरकारच्या डोक्यावरचा भार कमी करायला सुचवणारे सगळेच असतात. आत्महत्या केली तर लाखभर रुपये कुटुंबाला मिळतील...