पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे गाणे आनंदाचे : डॉ. रं. म. कदम, मराठी विभाग, अगस्ती महाविद्यालय अकोले

इमेज
 मुलांच्या कल्पना विश्वाचा खजिना  बाल कवितासंग्रह ‘माझे गाणे आनंदाचे’ प्रा. डॉ.रंजना मधुकर कदम डॉ.कैलास दौंड हे मराठी साहित्यातील महत्वाचे आणि मानाचे नाव. त्यांच्या कविता, कथा, कादंबरी इ. वास्तवदर्शी साहित्य वाचकांना आनंद तर देतेच त्याचबरोबर अंतर्मुख करते, विचार करायला भाग पाडते. त्यांनी लिहिलेला बालकवितासंग्रह ‘माझे गाणे आनंदाचे’ हा मुलांच्या बाल मनाला सहज आकर्षित करणारा, रमवणारा, आनंदमय विश्वात घेऊन जाणारा, त्यांचा उत्साह वाढवणारा आणि त्यांना सहजरीत्या खूप काही शिकवणारा आहे. लहान मुलांना नवनवीन, मनोरंजक, आकर्षक कल्पना आवडतात. म्हणूनच लहान मुले या कविता मनापासून वाचतात. कारण या कवितासंग्रहातून लहान मुलांचे उत्साही, खेळकर, काल्पनिक, चित्रमय विश्व साकार झालेले आहे. ते बाल मनाला रमवणाऱ्या विश्वात अगदी सहजतेने घेऊन जातात. उदा. ‘गच्चीवर जेव्हा झोपली मुलं आकाश अलगत खाली आलं अनोखं विश्व मग झालं खुलं चांदण्यांची झाली मोहक फुलं’  यातून दिसून येते की, यात कवीने मुलांच्या परिचयाच्या, त्यांना माहित असणाऱ्या गोष्टी मनोरंजकपणे, मुलांना गंमत-मौज वाटेल, आनंद होईल व तेही विचार करायला ला...

HOLI! होळी आली! बालकविता.

इमेज
    होळी आली.      होळी आली जवळ जराशी    वाढू लागले ऊन रे    डोंगर दऱ्या मधुनी आताशी    घुमू लागली धून रे!     वाळून गेले गवत अवघे    पाणगळही झाली रे    मृगजळाचे घोडे पळती    भुलून सारे भान रे!         पळस, पांगिरा, काटेसावर    लाल फुलांचा जाळ रे    वासाचा हा दरवळ नुसता    सुवास रानोमाळ रे!     कोण वदले या माळाशी    होळी आली म्हणूनी रे?     फाग उधळीत अंगावरती    झाडे अवघी लाल रे!    चला खेळूया आनंदाने   रंग होळीचे छान रे   सृष्टी सगळी ऐका गाते   नव रंगांचे गाण रे!          © डॉ. कैलास दौंड.

'काव्यफुले' सावित्रीबाई फुले यांचा कवितासंग्रह

इमेज
   • सावित्रीबाईंच्या क्रांतिकार्याचे प्रतिबिंब : 'काव्यफुले' कवितासंग्रह.                                           डॉ. कैलास दौंड       थोर समाजसेविका, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, पहिल्या शिक्षिका, महाराष्ट्रातील स्रीयांच्या भाग्यविधात्या क्रांतीज्योती सावित्री ज्योतिबा फुले यांचा  'काव्य फुले' हा इ. स. १८५४ मध्ये प्रसिद्ध झालेला पहिला कवितासंग्रह  असून यामध्ये एक्केचाळीस कविता आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या वात्सल्यमय कवीमनाच्या सुंदर रुपाची ओळख 'काव्यफुले' मधुन पटते. पहिलाच कवितासंग्रह असल्यामुळे सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या विचारांची आणि भावविश्वाची ओळख या कविता संग्रहातून  प्रत्ययास येते. समाज शिक्षणाची उत्कट तळमळ असलेल्या सावित्रीबाई यांच्या या कविता प्राधान्याने शिक्षणाकडे वळवणाऱ्या असून या कवितांमधुन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे...