पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जाणिवांची फुले

इमेज
    (पुस्तक परीक्षण )  • मुलांच्या जाणिवा विकसित करणारी- 'जाणिवांची फुले'                             प्रकाश रामचंद्र क्षीरसागर         पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात आजोबा आजी, काका- काकी शिवाय एखादी आत्या अशी जाणती मंडळी असायची. ती अनुभवसमृद्ध मंडळी रोज संध्याकाळी दिवेलागणीला परवचे म्हणायची. म्हणवून घ्यायची. त्यावेळी गोष्टीही सांगायची ही मंडळी. कधी कधी झोपताना लहाग्यांना रोज गोष्टी ऐकायला आवडत. गोष्टी ऐकतच ती झोपी जात. परंतु एकविसावे शतक उजाडले तेच मुळे एकत्र कुटुंबाचे विभाजन करीतच. अर्थात विसाव्यात नव्वदीच्या दशकातच त्याची सुरुवात झाली होती. हे सर्व पुराण सांगण्याचे कारण म्हणजे ती उणीव कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले' या पुस्तकाने बऱ्याच अंशी दूर केली आहे. या पुस्तकात सोळा संस्कारक्षम गोष्टी आहेत.          या गोष्टींतून संस्कार, विज्ञान, वाचनस...

परीक्षण

इमेज
तरल सामाजिक भावनांचा कवितासंग्रह :' बंदिस्त रूढीच्या विळख्यातून'                            डॉ. कैलास दौंड. 'बंदिस्त रूढीच्या विळख्यातून' हा ॲड विशाखा समाधान बोरकर साठहुन अधिक कविता समाविष्ट असलेला कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह असल्याने त्यात विविध भावनांचे लक्षवेधी रूपे अनुभवावयास मिळतात. तसेच जीवनप्रवासाची सजग उमज देखील अनुभवता येते. ' हा प्रवास प्रवास क्षणाक्षणांची ही आसर चालता चालता कसा संपतो हा श्वास.' अशा ओळी जीवनाची असोशी आणि काललय दाखवतात. त्या सहजच आवडून जातात. घर माणसाचे असो की त्यांना वात्सल्याची छाया आवश्यक असते. त्यातुन एक आपुलकीचा गंध दरवळत असतो तो सर्वांच्या हृदयाला स्पर्शून जात असतो. अशा वेळी पुढील  ओळी सहजच समोर येतात.         ' तो गंध रानमाळाचा         हृदयी कोरला जाई       ...

आजी आणि चिमणी

इमेज
 

पुष्पा सिनेमा 🎦या कारणासाठी पहावा

आजकाल पुष्पा चित्रपटातील डायलॉग आणि गाणी सद्ध्या सर्वत्र चर्चेत आहेत. 

मातीच्या नात्याची कविता : पाय मातीला बांधले डॉ. कैलास दौंड.

इमेज
• मातीच्या नात्याची कविता : पाय  मातीला  बांधले                              डॉ.  कैलास दौंड.                    ' पाय  मातीला बांधले' हा कवी जीवन आनंदगांवकर यांचा नवा कवितासंग्रह २६ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. हा त्यांचा प्रकाशित होणारा तेवीसावा कवितासंग्रह आहे. विपुल कवितालेखन करणाऱ्या या कवीच्या या संग्रहातील कविता देखील अत्यंत उत्कट आहेत.  जीवन आनंदगांवकर यांचे आजवर प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह : एका कवीच्या बरगड्यावर , गाभेमर आणि इतर कविता , कविता विनाशाच्या हंगामात  ,परतीचा गाव , आत्मभान  ,ऋतु आंधळे  ,ओंजळभर पाण्यासाठी ,आरंभ हाच अंत आहे , मातीच्या गंधातलं गाणं ,निर्मितीपूर्वीची उत्कट शांतता ,निरभ्र आकाशाची ओढ ,मनाचा मरणाविरुद्धचा एल्गार ,सर्वव्यापी मौनाच्या प्रतिक्षेत , मनाच्या अभयारण्यात ,कोर्टाच्या कविता ,तुझ्या जाण्यामुळे , बखाडीची अनिवार झडप ,पानगळीच्या दुःखाचे ओझे  ,अदालत: एक अहसास (हिंदी), २१व्या श...