पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भूमी आणि भूमिकानिष्ठ लेखकांचे आधारस्तंभ : डॉ नागनाथ कोत्तापल्ले.

इमेज
• भूमिका निष्ठ लेखकांचे आधारस्तंभ डाॅ .नागनाथ कोत्तापल्ले.                                डॉ. कैलास दौंड.   मराठी ग्रामीण साहित्य चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिलेदार म्हणून आदरणीय डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले सरांना महाराष्ट्र ओळखतो. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख, विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद चे कुलगुरू ही जशी सरांची ओळख आहे तशीच कवी, कादंबरीकार, लेखक आणि समीक्षक व भाष्यकार ही देखील सरांची ओळख आहे. या सर्वांसोबत असते ते सरांचे  कमालीचे माणूसपण ! इथली भूमी आणि भूमिपुत्र माणसे हा सरांच्या जिव्हाळ्याचा आणि आस्थेचा विषय. सन. १९८९-९१ या दोन शैक्षणिक वर्षात डि. एड. साठी मी मुखेड येथे होतो.  त्यावेळी डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले सर मुखेडचे आहेत असे समजले. त्यावेळी ते पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख होते. दोन वर्षापूर्वी एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला सरांचा मुखेडचे खूप सुंदर  चित्रण असलेला लेख वाचला. मुखेड मधील नदी,...

रे आभाळा... :वेदनेची आर्त ललकारी.

इमेज
परीक्षण :     'रे आभाळा… ' : वेदनेची आर्त ललकारी.  • 'रे आभाळा... ': वेदनेची आर्त ललकारी.                                                                                      डॉ. कैलास दौंड               रामकली पावसकर या मराठीतील महत्त्वाच्या कवयत्री आहेत. त्यांचे हंबर(१९८५),  ओले अथांग श्वास(२००८), सांजसावल्या (२०१५) , पावळण (२०१९) हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. आता त्यांचा 'रे आभाळा... ' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. 'आभाळ' या घटकाशी संवाद साधणारी कविता या कवितासंग्रहात...

डॉ. कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले ' बालसाहित्यकृतीला निर्मला मठपती साहित्य पुरस्कार प्रदान

इमेज
सोलापूर येथील निर्मला मठपती फाऊंडेशन कडुन दिला जाणारा सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार पाथर्डी येथील साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांच्या जाणिवांची फुले या बालकथासंग्रहास ख्यातनाम समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शिवस्मारक सभागृहात दिनांक ३०ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कथाकार योगिराज वाघमारे होते. या कार्यक्रमास प्रा.डॉ. शिवाजी शिंदे, राजेंद्र भोसले यांच्यासह सोलापूर शहरातील लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.          यावेळी बोलतांना प्रा. डॉ. राजशेखर शिंदे म्हणाले की कैलास दौंड यांची 'कापूसकाळ' कादंबरी राष्ट्रीय पुरस्कारांच्या तोडीची होती मात्र आपल्याकडे केवळ साहित्यकृती दर्जेदार असुन भागत नाही ही खंत आहे. दर्जेदार बालसाहित्याच्या बद्दल त्यांनी व्यक्त केलेली खदखद साहित्याप्रतीच्या बांधिलकीचे द्योतक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष योगिराज वाघमारे यांनीही बालसाहित्यात सामाजिक वास्तवाचा समावेश असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. श्रृती श्री वडगबाळकर यांनीही डॉ. कैला...