पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे गाणे आनंदाचे : विठ्ठल जाधव लिखित परीक्षण

इमेज
 

भूमिपुत्रांचे बाबासाहेब : समाजाला आत्मभान देणारी कविता. डॉ. कैलास दौंड

इमेज
  • भूमिपुत्रांचे बाबासाहेब : समाजाला आत्मभान देणारी कविता.                                  डॉ. कैलास दौंड     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान  कार्य भारतातील सर्व माणसाच्या उन्नतीचे आणि सर्वांगीण  प्रगतीचे आहे, सामाजिक समतेचे आणि विषमता निर्मुलनाचे आहे. त्यांचे संपूर्ण जीवनच समाजासाठी समर्पित होते. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या कार्याला समजून घेत त्यावर ग्रंथनिर्मिती केली आहे. मुळातच महाकाव्याचा विषय असणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाने  काहींनी काव्यग्रंथही निर्माण लिहीले आहेत. भूमिपुत्रांचे बाबासाहेब ही कवी चंद्रशेखर मलकमट्टे यांची दीर्घ कविता १४ एप्रिल २०१० रोजी पुण्यातील सुविद्या प्रकाशनाने प्रकाशित केली असुन तिची दुसरी आवृत्ती १४ ऑक्टोबर २०२० रोजी ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केली आहे." डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर बहुजन - ओबीसींसाठी जे कार्य केले ते लोक...

● उद्ध्वस्त गाव शिवारात जगणाऱ्या प्रत्येकाच्या अंतर्मनातील 'आगंतुकाची स्वगते

इमेज
   ● उद्ध्वस्त गाव शिवारात जगणाऱ्या प्रत्येकाच्या अंतर्मनातील  'आगंतुकाची स्वगते'                      प्रा. डाॅ. एकनाथ श्रीपती पाटील         आगंतुकाची स्वगते हा कैलास दौंड यांचा पाचवा कवितासंग्रह. हा कवितासंग्रह म्हणजे अस्सल आणि परिपक्व  वेदनेचा प्रसवाविष्कार आहे . ही 'आगंतूकाची स्वगते' कवीने तीन विभागात विभागली आहेत. पहिल्या विभागात मनाची 'सल आणि ओल' पानापानातून व्यक्त होताना दिसते तर दुसऱ्या 'नदीकाठ' या विभागात कवी महामानवांच्या वैचारिक सत्याच्या शोधात असताना दिसतोय. तर तिसऱ्या विभागात याच विचारांच्या काठाकाठाने आपल्याच स्वगतांमधून निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल  'दिसा-मासांच्या' कालीय अवकाशात करता येईल का? याचा शोध घेताना दिसतो.            दौंड यांची ही कविता खरंच स्वतःशी बोलतेय . उध्वस्त जगणं आणि आगतिक वागणं यांच्यातल्या द्वंद्वाचा हा जागतिक अंतरसंवाद आहे .गेल्या अनेक वर्षात बदललेल्या सामाजिक, राजकीय आणि जागतिक घडामोडींच्यामुळे समाजजीवन मुळापासून उध्वस्...

● मन जाणती जे मुलांचे, 'माझे गाणे आनंदाचे' ----- • विठ्ठल जाधव

इमेज
  ● मन जाणती जे मुलांचे, 'माझे गाणे आनंदाचे' -----                                  • विठ्ठल जाधव                    वर्तमान मराठी बालसाहित्य लेखनातील आघाडीचे नाव डॉ. कैलास दौंड यांचा 'माझे गाणे आनंदाचे ' हा बालकविता संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. बालसाहित्य लेखनाची धुरा सक्षमपणे पार पाडताना लेखकाला प्रौढ वाङ्मयनिर्मितीतून बालसाहित्य निर्मितीकडे का वळावे वाटले हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो.       बालमनाचे विविध कांगोरे खोलत आणि खुलत बालसाहित्य निर्माण होते. व्हावे लहानाहूनी लहान या भूमिकेत जावे लागते. सुक्ष्मातिसुक्ष्म बाबींचे निरीक्षण करावे लागते. जे कि बालकाच्या नजरेने पहावे लागते. बालभाषा शैली, तिचा आविष्कार अवगत करावा लागतो. बालकांच्या मनाची मशागत करण्यासाठी बाल साहित्यिकास जास्त कष्ट घ्यावे लागतात. बालमन...

• 'काटेरी पायवाट ' : धडपडणाऱ्या तरूणांना भान देणारे आत्मकथन.

इमेज
  • 'काटेरी पायवाट ' : धडपडणाऱ्या तरूणांना भान देणारे आत्मकथन.                             डाॅ. कैलास दौंड            'काटेरी पायवाट' हे प्रा. डाॅ. अनंता सूर यांचे आत्मकथन. त्यांच्या या आत्मकथनातुन ग्रामीण भागातील मुलाची कठीण शैक्षणिक वाटचाल समोर येते. त्यासोबतच सहाजिकच कुटुंबातील माणसे, परीसर, वाट्याला आलेली अभावग्रस्तता, वेळोवेळी येणाऱ्या अडचणी, त्यावर कष्टाने आणि निर्धाराने केलेली मात आणि त्यानंतर प्राध्यापक होण्यापर्यंत मारलेली मजल 'काटेरी पायवाट' मधून कळत जाते. लेखकाची कौटुंबिक  पार्श्वभूमी, घरातील व इतर नातेवाईक यांचे प्रसंगपरत्वे येणारे चित्रण, लेखकाचे   बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तसेच या विविध टप्प्यावर त्याचे विकसित होत जाणारे आकलन आणि विचारविश्व, त्याने जपलेली कष्टावरील श्रद्धा आणि विश्वास , माणुसकी उलगडणारे हे आत्मकथन अलीकडील काळातील महत्त्वाचे आत्मकथन आहे. आपल...