पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असं सपान पडलं,पंढरीला गेल्यावाणी

इमेज
•असं सपान पडलं,पंढरीला गेल्यावाणी पंढरपूरचा विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या भेटीची ओढ सश्रद्ध मराठी मनाला लागून असते. या दैवताचा मानवी नात्याच्या पातळीवरही इथले लोकमन लोकगीतातून‌ व्यक्त झालेले आहे. कितीतरी लोकगीते, स्रियांच्या ओव्या यातून लोभस रुपात पंढरपूरच्या कथा अनुभवायला मिळतात. आपल्या दररोजच्या जगण्यातील पती पत्नीच्या नात्यातील लुटूपुटूच्या भांडण्याचा अनुभव आपल्या आवडत्या देवाच्या जीवनात घडू शकतो अशी कल्पना लोकसाहित्यातील कथा आणि गीतांमधून आलेली आहे. रुक्मीणी विठ्ठलाला म्हणते की तुम्ही माझ्यापेक्षा तुमच्या भक्तांकडेच अधिक लक्ष देता,त्यांनाच अधिक वेळ देता‌ त्यामुळे मी रागाने रुसून जाईन. मग तर तुम्ही मला शोधाल पण काही सापडणारे नाही त्यामुळे तुम्हाला संपूर्ण पंढरपूरात माझा शोध घेत हिंडावे लागेल. विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या नात्यातील गोडवा मानवी पातळीवर आणून त्याला लोभस ओवीरूप लोकांनी दिले आहे. ते असे-     ' रुक्मीण म्हणती देवा,मी गं रुसून जाईन       अवघी पंढरी तुम्हा ,धुंडाया लावीन.' तर पंढरपूरात संत जनाबाईचा तवा चोरीस गेला असून त्याच्या शोधासाठी संत न...

भाऊबीजेची ओवाळणी

भाऊबीजेची ओवाळणी दिवाळीच्या नंतर बलिप्रतिपदा आणि लगोलग भाऊबीज येते. या दिवशी बहीण तिच्या बंधूराजाला ओवाळते. कार्तिक महिन्यातील ही शुद्ध द्वितीया. चंद्र जसा कलेकलेने वाढत जातांना दिसतो तसे बहीण भावातील प्रेमानुबंध वर्धिष्णू होत जातात. भाऊबीजेच्या सणाला बहिणीला माहेराची ओढ निर्माण होते. ती आपल्याला माहेरातून बोलावणे येईल याची वाट पाहू लागते. मुलीला आणायला जाणाऱ्या व्यक्तीला 'मुराळी'(मुऱ्हाळी) म्हणतात. बऱ्याचदा भाऊकडेच ही जबाबदारी असे. अशा मुऱ्हाळ्याची वाट पाहणाऱ्या बहिणीची भावना स्रियांच्या ओवीतून व्यक्त झाली आहे. ती म्हणते -   ' साऱ्या सणामंदी सण दिवाळी गं आनंदाची ।    नेणत्या बंधूची गं ,वाट पाहते गोईंदाची ॥' त्याची वाट पाहता पाहता कधी तो फोन करून माहेरी बोलवील तर कधी स्वतः बहिणीच्या गावी जाऊन तिला घेऊन येईल. मात्र बहिणीच्या कल्पनेत तो तिला न्यायला आलेला असतो. तो भाऊ मायाळू असतो. तो आर्थिक स्थितीने कसाही असो तिच्यालेखी तो श्रीमंत असतो. अशावेळी बहिणीच्या मुखी लोकगीतातील पुढील ओवी सहजच येई. '' भाऊबीजाच्या गं दिसी भाऊ बहिणीच्या देशाला । माझ्या गं बंधवाच्या मोती ...

दिन दिन दिवाळी

इमेज
दिन दिन दिवाळी  पूर्वी खेडेगावात अनेक लोकांच्या घरी गाईगुरे असत. सण आणि उत्सवात गाईगुरांची, वासरांची, बैलांची पूजा केली जाई. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाई. दिवाळी सणातील द्वादशीला 'वसुबारस' असे नाव आहे; वसुबारशीलाच काही भागात 'वाघबारस' म्हणूनही ओळखतात. तेथे वाघदेवाची पुजा केली जाते. पुजा केल्यावर तो आपल्या गुरावासरांचे रक्षण करतो असा श्रद्धाभाव असतो. जेथे पशुपालन अधिक प्रमाणात केले जाते अशा ठिकाणी वसुबारस साजरी केली जाते. वसुबारशीच्या आधीच तीन-चार दिवस गावातील मुले वसुबारसीच्या तयारीला लागत. म्हणजे गाईला आणि तिच्या वासराला आनंदाने आणि कृतज्ञतेने ओवाळण्यासाठी मुले काकडा तयार करण्याच्या कामाला लागत. काकडा कापसाचे पलिते तयार करून ते तेलात बुडवून देखील तयार केला जाई. परंतु एरंड किंवा बिलाईत यांच्या बियांचे वरील सालपट काढून आतील भाग एका तारेला गुंतून अनेक बियांचा काकडा तयार केला जाई. तो लवकर पेट घेई. आणि बराच वेळ जळत राही. शिवाय त्यासाठी घरातील कापूस व तेलही खर्च होत नसे. एका अर्थाने तो काकडा इकोफ्रेंडली होता म्हणा हवं तर! तो काकडा घेऊन काही मुले गायी व वासरांच्या...

डॉ ‌कैलास दौंड : अल्प परिचय|| मराठी भाषिक लेखक,कवी|•

                        परिचय पत्र    डॉ. कैलास दौंड •पूर्ण नाव:  डॉ. कैलास रायभान दौंड • जन्म दिनांक: १/०६/१९७३ • पेशा - शिक्षक  •शिक्षण : एम. ए. (मराठी), बी.एड., डी.एड., पीएच.डी., नेट (मराठी). •शाळेचा पत्ता : जि.प.प्रा.शाळा : हंडाळवाडी या.पाथर्डी जि.अहमदनगर.पिन 414102  •कायमचा पत्ता : मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन 414102 Email address: kailasdaund@gmail.com •भ्रमणध्वनी: 9850608611 •शैक्षणिक पात्रता      परीक्षा/पदवी.             उत्तीर्ण वर्ष                   बोर्ड /विद्यापीठ  S.S.C.                  २१/०६/१९८८.               S.S.Cपुणे बोर्ड   D.Ed                   २९/०७/१९९१.               शासकीय परीक्...

जाणिवा लोकसंचिताच्या

इमेज
कष्टाच्या सहनशीलतेची गाथा : जनी         गंगाखेडची जनाबाई दामाशेटी यांच्याकडे राहीली.तिथे तिने दळणकांडण करणे, गोवऱ्या वेचणे अशी कष्टाची कामे केली.दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील. जनाबाई स्वतःला 'नामयाची दासी जनी' असे म्हणून घेते. कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल तिची कधीही ,काहीही तक्रार नव्हती. तिचे मन आणि चित्त विठ्ठल भक्तीत रममाण झालेले होते. प्रत्येक कामात माझा विठ्ठल मला मदत‌ करतो अशी तिची भावना होती. 'झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी '  अशी तिची श्रद्धा अभंगातूनही व्यक्त झालेली आहे. महाराष्ट्रातील स्रियांची संत जनाबाई आजही लाडकी आहे. तिची सोशिकता, श्रद्धा आणि भक्तीभाव सर्वांना चकित करून जातो. संत जनाबाई या नावाभोवती अनेक आख्यायिकांचे वलय आहे. त्याचे कारण तिची विठ्ठलभक्ती आहे. मराठी लोकसाहित्यामध्ये संत जनाबाईचे अढळ स्थान आहे. संत जनाबाईंच्या विठ्ठल भक्तीने लोकमानसाने साक्षात विठ्ठलालाही माणूस पातळीवर आणले आणि ओव्यांमधून गाईले. एका ओवीत श्रीविठ्ठल त्यांच्या राहीला समजावतांना दिसतात -        ...