पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अहमदनगरचे साहित्य : एक दृष्टीक्षेप

इमेज
अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान '            डॉ. कैलास दौंड        ○ पूर्वपिठिका : मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाषा आहे. या राज्याच्या लगतच्या भागातही या भाषेचा वापर केला जातो. जेथे जेथे मराठीचा वापर आहे त्या त्या भागातून मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीची अधिकतर शक्यता असते . कारण संवाद साधणे हा वाङ्मय निर्मितीचा प्रमुख हेतू असतो. 'अहमदनगर जिल्ह्याचे मराठी साहित्यातील योगदान 'या विषयाच्या अनुषंगाने विचार करतांना सर्वप्रथम या जिल्ह्याच्या विस्तृत भौगोलिक क्षेत्राकडे लक्ष वेधले जाते. अहमदनगर  (शहराची) स्थापना इ.स. १४९४ साली झाली. त्याही पूर्वीची काही वर्षे हे ठिकाण राजकीय केंद्र होते. नंतर निजामशाहीचेही हे केंद्रच होते .म्हणजे येथे राजसत्ता होती आणि त्या आश्रयाने वाढणारे, राहणारे लेखक, कलावंत हे देखील असणारच. आजच्या अहमदनगर जिल्ह्याबद्द्ल बोलतांना  या जिल्ह्य़ातील विस्तृत भूभाग आपले लक्ष वेधून घेतो. आजही महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून या जिल्ह्य़ाचा लौकिक आहे. राज्याच...

गाव : ऊब आणि धग १

इमेज

गाव : ऊब आणि धग १३

इमेज
                □ गाव चिरंतन आहे. ___________________डॉ. कैलास दौंड ________________________________     काळाच्या लाटा येती , गावाच्या भाळावरती ।     गावपणाला येते जाते, ओली- सुकीशी माणूस भरती॥         लोकवस्तीच्या रूपाने अस्तित्वात असणारा गाव तगधरू आहे. आता मोडेल, संपेल,उदासपणे ओस पडेल, केवळ खुणा उरतील असे वाटत असतांनाच कुठेतरी त्याला पालवी फुटत असते. कात टाकून गाव नवे रूप घेत असते. एकुणच काय तर गाव कमालीचे तग धरू आहे. म्हणूनच गावाला शेकडो वर्षाचा इतिहास असतो. त्याची पूर्वीची नावे वेगळी असतात, काळानुरूप गाव नवी नावे सुद्धा धारण करते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे गावाला कधीकधी त्याची जागा बदलावी लागते. अशा कठीण काळातही गाव आपले आधीचे नाव आणि आधीचे जगणे विसरत नाही. काळाचे आणि बदलाचे अनेक आघात झाले तरीही गाव जिवंत राहण्याचा प्रयत्न करत राहते. गावाच्या लेखी ते जणू अपरिहार्य असते. गाव जमीन, डोंगर, घरे, रस्ते, शाळा इत्यादींनी बणलेले असले तरी ते जैविक दृष्ट्या आणि ...

गाव : ऊब आणि धग १२

गाव : नवे रंग, नव्या जखमा                               डाॅ. कैलास दौंड   गावच्या सुपिक मातीला आता नापिकीचे बहर येतांना दिसू लागले आहेत. पहिल्या पावसानंतर येणारा मृदगंध रोमारोमात चैतन्य भरवण्या ऐवजी रोगराईला साद घालत आहे. मात्र तरीही गावातील अस्सल सर्जनाची ओढ काही संपलेली नाही. बदलत्या काळात जग बदलत असतांना गाव बदलणे अगदीच सहाजिकच होते. बदल हा तर सृष्टीचा नियमच त्याला अव्हेरून कसे चालेल. मात्र या बदलाला व्यक्तिगत स्वार्थ,  नियोजनशून्यता आणि  दूरदृष्टीचा अभाव याची कुसंगत लाभल्याने गावाच्या नव्या रंगात नव्या जखमांचे दर्शन सहजच घडू लागले आहे .  नवनिर्मितीचा लोभस  रंग कायमच माणसाला खुणावत आलेला आहे. उगीचच भाबडेपणाने ' जुने ते सोने' उगाळणे योग्य नसले तरी या गाव बदलांचा मागोवा घेणे हे नव्या पिढीला भान येण्यासाठी आवश्यकच असते.                गाव बदलत असता...

गाव : उब आणि धग भाग ९

इमेज
  गाव : उब आणि धग (९) □ पंखावर त्यांनी , झेलले आभाळ!                          डॉ. कैलास दौंड      "पंखावर त्यांनी, झेलले आभाळ       मिळविले बळ, पोटासाठी." पाव शतकापूर्वी बर्‍यापैकी समृद्ध भासणारा गाव आता तिथल्या माणसांच्या गरजाही नाही भागवू शकत. तसं हे चित्र एकदम पालटलेलं आहे असं नाही. नव्वदच्या दशकापासून दिसामासानं हे बदल नजरेत भरायला लागलेत. किमान पोटाची खळगी भरावी एवढ्याचसाठी गाव सोडून इथे तिथे भटकण्याची वेळ अनेकांवर आलीय. थोडीशीच असलेली जमीन; सिंचनाच्या सोईचा अभाव आणि कुठे विहीर वगैरे असलेच तर विजेच्या नावानं आणि उन्हाळ्यात पाण्याच्या नावानं ठणाणा ऽऽऽ! असा ' ठणाणा पोरा ऽऽ ठणाणा ऽऽऽ' चा खेळ झाल्यानंतर आपलं चंबूगबाळ डोक्यावर घेऊन गावाबाहेर पडावं लागल्यास नवल ते काय?         पावसाचं पाणी साचावं यासाठी जागोजाग खड्डे खणले गेलेत पण पर्यावरणीय बदल, हवामान बदल आणि बेलगाम बेफिकीरीने...