पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'रिंगण': सजग भावांदोलनाची कविता. डाॅ. कैलास दौंड

इमेज
  'रिंगण': सजग भावांदोलनाची कविता.                                     डाॅ. कैलास दौंड     मराठीमध्ये कविता मोठ्या प्रमाणात लिहीली जाते मात्र स्रियांची कविता तशी कमीच आहे. 'रिंगण' नावाचा कवयत्री माधुरी मरकड यांचा  पहिलावहिला कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कवितासंग्रहात सत्याहत्तर कविता आहेत. फारशी पूर्व प्रकाशित नसलेली कविता 'रिंगण ' च्या रूपाने मराठी काव्यरसिकांच्या समोर आली आहे. या कवितासंग्रहातील कवितांचे दोन भागात वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे स्त्रीवादी कविता आणि दुसरा भाग निखळ भावकविता .           स्रीवादी कवितांमधून कवयत्रीच्या स्रीवादी जाणिवेची क्षितिजे विस्तारत असल्याची ओळख पटवणार्‍या काही कविता येतात. तर निखळ भावकवितेत अन्य विविध भावानुभूतीच्या कविता येतात. यात बापाचा मृत्यू,  प्रिय आई, प्रिय मुली, प्रिय आजी अशा नातेसं...

गावखेड्यातील तरूणांची भयावह शोकांतिका- तुडवण.

इमेज
  ○ गावखेड्यातील तरूणांची भयावह शोकांतिका- तुडवण.                                •  प्रा. डॉ. द. के. गंधारे                                                   ग्रामीण साहित्यिक कैलास दौंड यांचा जन्म पाथर्डी तालुक्यातील सोनोशी या खेडेगावात झाला. ग्रामीण जीवनाचा त्यांनी जवळून आणि सजग अनुभव घेतल्यामुळे त्यांच्या  एकूणच साहित्यातुन  ग्रामानुभवाची सशक्त मांडणी येते. शेतीमाती आणि तिथल्या माणसाशी नाते जोडून त्यांनी शेती बरोबरच  गावगाड्याचे गाऱ्हाणे वेशीवर टांगण्याचे काम केले . 'कापूसकाळ', 'पाणधुई' या त्यांच्या कादंबऱ्या ग्रामजीवनाचे वास्तवरूप मांडतात. 'अंधाराचा गाव माझा', 'उसाच्य...

गाव खेडे, आणि निसर्ग अशा सहवासात वाढत असलेल्या बालमनांचं प्रतिबिंब म्हणजे "मा झे गा णे आनंदाचे"

इमेज
 गाव खेडे, आणि निसर्ग अशा सहवासात वाढत असलेल्या  बालमनांचं प्रतिबिंब म्हणजे  "मा झे गा णे आनंदाचे" अर्जून देशमुख  ------------------##### बघता बघता सारं काही ऑनलाईन झालं. ग्लोबलायझेशन. ..आणि सारं काही डिजीटल झालं. मोबाईल ने तर क्रांती च केली. आणि प्रत्येकजण मोबाईल झाला. विविध वाहिन्यांचं जाळं , आणि बरच काही. ..! एकूण अनेक बाबतीत बालमनांवर परिणाम झाला. आणि होतो आहे.  मुले मोबाईल वापरण्यात मास्टर झाली. मोबाईल कसा हाताळायचा त्यातले अॅप्स, फेसबुक, व्हाॅटस्अप, यू ट्यूब, टिक टाॅक, आणि पफ जी सारखे संमोहित करणारे जीवघेणे गेम्स. ..याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.  मोबाईल कसा वापरावा हे मोठ्यांना मुलांकडून शिकावं लागतं हे आजचं वास्तव आहे! म्हणजे "गुरूला चेला भारी"..!हे असं झालय.  ऊन, वारा, पाऊस, ऋतू, महिने, सण, वार, उत्सव, डोंगर, नद्या, ,झाडे, वेली, फुले , फळे ,आकाश , जमीन, चंद्र, चांदण्या, प्राणी, पक्षी या भोवतीच्या विश्वापासून बालमने दुर्मिळ झाली.  आणि या जरा इकडे मुलांनो. .गाणे गावू आनंदाने. . म्हणत कवी डाॅ. कैलास दौंड बालमनास कवितेतून साद घालत आहेत. अवघ्या ...

संस्काराची पेरणी : माझे गाणे आनंदाचे : डाॅ. भाऊसाहेब मिस्तरी

इमेज
॥ आगंतुकाची स्वगते॥ बालकविता संग्रह   संस्कारांची पेरणी - माझे गाणे आनंदाचे                  ● डॉ.भाऊसाहेब मिस्तरी                       बालसाहित्य लिहितांना पालकाला बालक होता यायला हवं असं मला मनापासून वाटतं. ज्या कोणाला हे खऱ्या अर्थाने जमलं तो खरा बालसाहित्यिक ! त्यांच्या लेखणीतून उत्तमोत्तम असं बालसाहित्य निर्मिती होत असते ही माझी समज आहे.  साने गुरूजी वयाने मोठे होते तरी ते मुलांमध्ये मुल होऊन "श्यामची आई " सारखी  'संस्कार गाथा ' सांगून गेलेत. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ती महत्त्वाची आहे.   समकालीन मराठी साहित्यात काही बालसाहित्यिक यांची नावे पटकन आठवतात. आबा महाजन,उत्तम कोळगावकर, एकनाथ आव्हाड, दासू वैद्य, पृथ्वीराज तौर आधी नावं सहजपणे ओठांवर येतात. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून मा. किरण केंद्रे सर यांच्या हातून ' किशोर ' मासिकाच्या माध्यमातून मोठे काम होत आहे. बालसाहित्यिक म्हणून आता डॉ. कैलास दौंड यांचे नाव लक्षात राहतं. त्यांचा " माझी गाणे आनंदाचे " ह...

आगंतुकाची स्वगते : डाॅ. कैलास दौंड यांचा नवा कवितासंग्रह

इमेज
 आगंतुकाची स्वगते या कवितासंग्रहासाठी डाॅ. कैलास दौंड यांना सायं. ६  ते ९ या वेळेत संपर्क करा : 9850608611 ISBN : 9789386421401

'मातीचे अत्तर

इमेज
  •'मातीचे अत्तर' : निसर्गरूपाचे विलोभनीय दर्शन घडवणारा हायकू संग्रह.                               डाॅ. कैलास दौंड. 'मातीचे अत्तर' नावाचा राजन पोळ यांचा नवाकोरा हायकू संग्रह नुकताच संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. एकुणच जपानचा हायकू आता मराठी मातीत बर्‍यापैकी बाळसे धरू लागलेला आहे. तो देखणा आणि भावतरल होत होत नेमक्या अक्षरातही अवतरत आहे. अल्पाक्षरत्व हे तसे एकूणच कवितेचे व्यवच्छेदक लक्षण मानले गेले असले तरी सद्ध्याच्या पसरट आणि गद्यात्म स्वरूपाच्या कवितेमुळे रसिकवाचकांनी कवितेकडे पाठ फिरवल्याचेही कधीकधी नजरेस येते. तर यमक, छंद आणि लघूगुरू यांच्या तांत्रिकतेत अडकलेली व बर्‍यापैकी वाढत असलेली बहुतांश मराठी गझल आपला प्रभाव आणि परिणाम दाखवू शकत नाही. अर्थात मोजकी व सकस गझल लिहिणारी चार सहा नावेच मराठीतील उत्तम गझलकार म्हणून ओळखली जातात. मध्यंतरी 'चारोळी' काव्यप्रकाराने युवावर्गाला भूरळ घातली होती. 'हायकू' हा त्याही पेक्षा लहान काव्यप...

कापूसकाळ : एक समीक्षा लेख

इमेज
 

महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अंक जुलै ते सप्टेंबर २०२० मधील 'तुडवण कादंबरी ची समीक्षा.

इमेज
 

○ उंदरीन सुंदरीन : वैविध्य जपणारा बालकविता संग्रह.

इमेज
  ○  उंदरीन सुंदरीन : वैविध्य जपणारा बालकविता संग्रह.           डाॅ. कैलास दौंड 'उंदरीन सुंदरीन' हा विठ्ठल जाधव या कवीचा बालकविता संग्रह नुकताच नांदेडच्या  इसाप प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. 'पांढरा कावळा' या बालकुमार कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी राज्य वाङ्मय पुरस्कार मिळाल्यानंतरच्या विठ्ठल जाधव यांच्या या बालकविता संग्रहाकडे वाचकाचे लक्ष वेधले गेले आहे. या बालकविता संग्रहात सदतीस बालकविता असून त्या बाल ते किशोर वयोगटातील मुलांच्या भावविश्वातील व अनुभव जगतातील विषय ते जबाबदारीने घेऊन आलेले दिसतात.      आई हा बालकाचा पहिला मित्र, शिक्षक, काळजीवाहक, आधार आणि सर्वस्वच असते.    'उंदरीन सुंदरीन'  बालकविता संग्रहात 'आई' संबंधी 'आईचा वाढदिवस' , 'मातृॠण' , 'माझी आई' , 'आई तुझी हाक' या कविता येतात. आपल्या बाळाच्या भावनांशी ती जणू एकरूप होते. मुलांना देखील हे दिसते. 'आईचा वाढदिवस' या कवितेतील बाळ म्हणते   -           ...

○ सुखवस्तू चिमणी

इमेज
  बाल-किशोर कथा                ○ सुखवस्तू चिमणी           डोंगराच्या कुशीत वसलेले एक गाव होते. आजूबाजूला झाडे होती. ओहळ आणि ओढे होते. त्यावर एक छोटे तळे होते. गावाच्या दुसर्‍या बाजूला शेती होती. थोडीफार चराऊ रानेही होती . कधीकधी काही लोक लाकुडफाटा मिळवण्यासाठी डोंगरातील झाडे तोडायला निघत. अशावेळी गावातीलच इतर माणसे त्यांना अडवत असत. उन्हाळ्यात ओहळ आणि ओढ्यातील पाणी आटून जाई तरी लोकांच्या शेतातील विहिरींना पाणी असे. त्यातून ते पिकाला दिले जाई. गावात आणि शेता शिवारात माणसांची सतत वर्दळ असे. डोंगरातील आणि शेतातील झाडाझुडपात  अनेक पाखरांची गजबज असे. त्यांच्या वेगवेगळ्या आवाजाचे सुरेल संगीत रानावर पसरे. सारे चैतन्याचे वातावरण होते. गावाला खेटूनच अनेक झाडे होती. त्यातील चिंचेचे झाड खूप मोठे होते. चिंचेच्या झाडाला चिंचा लागायला सुरुवात झाली की तिथे पक्ष्यांची खूप वर्दळ वाढे, जणू जत्राच भरे ! या झाडावर रिंकी आणि पिंकी या दोन चिमण्या राहत. त्या एकमेकीच्या जीवलग मैत्रिणी असल्...

● 'आईचा हात' अ.म. पठाण यांच्या निसर्गसंपन्न बाल- कुमार कविता.

इमेज
  ● 'आईचा हात' अ.म. पठाण यांच्या  निसर्गसंपन्न बाल- कुमार कविता.                          डाॅ. कैलास दौंड                                                                                                               'आईचा हात' हा कवी अ. म. पठाण यांचा नवाकोरा  बाल कवितासंग्रह. तो औरंगाबाद येथील गाव पब्लिकेशन्स ने १५ ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित केला आहे. कवी अय्युब पठाण लोहगावकर तथा अ. म. पठाण हे बाल साहित्यिक म्हणून महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहेत. 'आईचा हात' बालकविता संग्रहात सत्तेचाळीस कवितांचा समावेश आहे. 'आई' हा बाल विश्वातील अत्यंत आत्मीयतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. आई म्हणजे जणू...

तुडवण - गावाकडच्या करपलेल्या स्वप्नांची .- बाबाराव मुसळे .

इमेज
    ●  तुडवण - गावाकडच्या एका अतिसामान्य कुटुंबाच्या करपलेल्या स्वप्नांची. - बाबाराव मुसळे.        कैलास दौंड यांची अलीकडेच मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली 'तुडवण' कादंबरी नुकतीच वाचली. बीड जिल्ह्यातील  शिरूर कासार परिसरात घडणारी ही एका कुटुंबाच्या दयनीय वाताहतीची मन हेलावून टाकणारी दुर्दैवी कहाणी. मुळात बीड जिल्हा म्हटलं ,की शेतीसंबंधाने  कायम दुष्काळ .’इथं जगण्याची तीन नावं म्हणजे ‘बखाड,उन्हाळा आणि दुष्काळ’’असं लेखकाने पृष्ठ १९१ वर नमूद करून ठेवलेलं आहे . बखाड म्हणजे अल्पवृष्टी . त्यामुळेच कायम दुष्काळ .म्हणजे इथल्या लोकांच्या नशिबात बाराही महिने उन्हाळा . त्यामुळेच त्यांच्या दुःखाला पारावार राहत नाही . जगण्याच्या किमान अपेक्षाही इथं पूर्ण होत नाहीत. मुळात अवतीभोवती भव्य दिव्य प्रेरक असं काहीच नसल्याने अंगी बाळगलेली स्वप्नेही तशीच खुरटीच असतात .पण तीही पूर्ण करता येऊ नये एवढा दैवदुर्विलास नशिबी आलेल्या एका अतिसामान्य कुटुंबाची ही करूण कहाणी आहे. डि .एड . होऊन कुठेतरी शिक्षक म्हणून नोकरी करू. त्यामुळे घरच्यांच्या मुखा...

तुडवण: ललित लक्षवेधी पुस्तक

इमेज
ललित लक्षवेधी: फेब्रुवारी २०२०: प्रा. सुहासिनी किर्तीकर, मुंबई  तुडवण : कैलास दौंड मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस : ३०८, फिनिक्स ४५७, एस.व्ही.पी.रोड , गिरगाव, मुबई-४००० पृष्ठे : २४५, मूल्य : तीनशे रुपये शेती, जमीन, शेतकरी हा मराठी मनात रिघलेला विषय. स्वप्ने अधिक रंजकपणे पाहणाऱ्या साहित्यात.विशेषतः कवितेत वा गीतात; या विषयाभोवती कविकल्पना रुंजी घालत राहते. कोवळे, सुंदर, हृदय असे भावचित्र उभे करते. अशा भावगीतातून एखादा शेतकरी बायकोला म्हणतो, ये पिकवू अपुला शेतमळा, उगवू मोतीचुरा.      ते हिरवे लोलक डुलती, भरला हरभरा'... किंवा 'काळ्या काळ्या शेतामधी घाम जिरव घाम जिरव, तेव्हा उगल उगल काळ्यामधून हिरव...' पण वास्तवात ते इतके प्रेममय, उत्साहजनक नसतेच.मोतीचूर उगवतोच असं नाही; उलट अनेक स्वप्नाचा चुरा होत जातो. कष्टांना सीमा नसते. दारिद्र्याला असीम जमीन असते. संसार गाठी मारमारून करावा लागतो, एकेक आयुष्य मातीमोल होत जाते. हे सगळे वास्तव 'तुडवण' या कादंबरीत जिवंत झालं आहे. मात्र या वास्तवाला स्वप्रयत्नाने तुडवत कादंबरीतील व्यक्ती आपापल्या ताकदीने सामोर्या जातात. 'तुडवणची वा...

आधुनिक ग्रामवास्तवाचा आलेख : तुडवण / विठ्ठल जाधव

इमेज
    पुस्तक परिक्षण   ○ आधुनिक ग्रामवास्तवाचा आलेख - तुडवण                                      ○ विठ्ठल जाधव            कास्तकाराच्या पिढ्या परंपरागत वेदनादायी जीवन  जगत आल्या आहेत. 'खेड्याकडे चला' हा महात्मा गांधी यांचा संदेश आजपावेतो आणि यापुढे कैक पिढ्या अंमलात येईल याची शाश्वती नाही. द्रारिद्र्य आणि अज्ञान यांच्या खाईत खितपत पडलेल्या ग्रामसमाजास दिशा देण्याचे काम लोकशाही व्यवस्थेने करावे , हे अभिप्रेत असताना तसे मात्र घडत नाही. अंधःकाराच्या कडा अधिकच गडद होत जात आहेत. फक्त पांघरून बदलले आहे समस्या कायम आहेत. शेतीव्यवसायात बदलत्या जीवनशैलीमुळे जटीलता आलेली आहे. कायद्याचा अर्थ स्वार्थाच्या बाजूने लावला जात आहे. त्यामुळे नातेसंबंध, गावखेडी उध्वस्त होऊन नवीन समाजरचना निर्माण होते आहे.  ही सल 'तुडवण' या कैलास दौंड यांच्या कादंब...